Saturday, 14 September 2013

सुधारवादी संपादक डॉबाबासाहेब आंबेडकर

                                             
डॉ . आंबेडकर परदेशात शिकलेले उच्चविद्याविभूषित होते . दलित बांधवामध्ये जागृती आणि त्यांचे संघटन धरण्याच्या उद्दशाने त्यांनी पत्रकारिता सुरु केली . दलित समाज अशिक्षित होता . त्यामुळे त्यांनी आपली वर्तमानपत्रे मराठीतूनच काढली मूकनायक , बहिष्कृत भारत , जनता आणि प्रबुध्द भारत या चार वर्तमानपत्रांचे संपादन त्यांनी केले .


    पाक्षिक मूकनायक जानेवारी , 1920 मध्ये सुरु झाले . शाहु महाराजांनी त्यांना या कामी साह्य केले . केसरीने मूकनायकची जाहिरात छापण्यास नकार दिला होता . अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे व त्यांची उन्नती साधने हा मुकनायकाचा उद्देश होता . पाडुंरंग भटकर यांची त्यांनी संपादकपदी नियुक्ती केली . मूकनायक हे डॉ . आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वाच्या प्रारंभीचे वर्तमानपत्र होते . ते 8 एप्रिल , 1923 ला बंद पडले . मूकनायकमधून त्यांचे विचार प्रभावीपणे लोकांसमोर आले . पुढे 3 एप्रिल , 1927 ला त्यांनी पाक्षिक बहिष्कृत भारत सुरु कले . उत्तम कदम , भा . वि . प्रधान आदींनी त्यांना या कामी साह्य केले . या पत्राची आर्थिक आवस्था खूपच नाजूक होती . या पत्रातून त्यांनी अनेकांवर कठोर टीका केली . 15 नोव्हेंबर , 1929 ला बहिष्कृत भारत बंद पडले . 1930 मध्ये त्यांनी पाक्षिक जनता व 1955 मध्य प्रबुध्द भारत हे साप्ताहिक सुरु केले .
                                               

    डॉ . आंबेडकरांचे शिक्षण इंग्रजीतून झाले होते . त्यामुळे सुरवातीला मराठीतून लिहिण्यात त्यांना अडचण येत असे . मराठी भाषा भारदस्त करण्यासाठी संत वाड : मय , नव्या जुन्या लेखकांचे साहित्य व समकालिन पत्रकारांच्या लेखनाचा अभ्यास त्यांनी केला . आपला वाचकवर्ग डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी सोप्या पध्दतीने लेखन केले . त्यांचे लेखन नशिब व ते तर्कशुध्द पध्दतीने मांडित असत . बहिष्कृत भारतमधून त्यांनी लोकहितवादींच्या पत्रांचे पुनर्मुद्रण केले . डॉ . बाबासाहेब आंबेडकर प्रतिभाशाली , ध्येयवादी व सुधारणावादी संपादक होते .

No comments:

Post a Comment