Sunday 12 June 2016

कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही??

कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही??
ऑनर किलिंग करू नका.. प्रेम युगलानामारू नका.. जन्माला घातलेला माणूस आहे.. कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही?? आहे काय तुमच्याकडे मराठा असणं.. ब्राम्हण असणं.. मुसलमान असणं.. बौद्ध असणं.. हिंदू असणं.. म्हणजे काय असतं..?? तोडाने खाता आणि बुडाने हागतात ना तुम्ही लोक?? कशाची जात-धर्म लावून धरली तुम्ही.. माणसाची औलाद आहात.. एवढा जर जातीचा ठेका घेतला ना तुम्ही सिद्ध करून दाखवावे जात-धर्म म्हणजे काय?? आम्ही उलटीकडून खातो आणि उलटीकडून करतो हे तुम्ही दाखवावं... तुमच्या चेतना.. संवेदना.. वेदना मानवी एकसारख्या आहेत.. हो प्रेम होणार आणि ते नर मादी.. स्त्री पुरुषात होणार तुमचा जाती-धर्म बघून प्रेम नाही होत.. जगा ना हो भारतीय संविधानानुसार माणूस म्हणून जगा...
बस झाली तुमची जात-धर्म वाटोळा केल हो तुम्ही या देशाचं... किती मने तोडणार तुमच्या खोट्या इज्जतीसाठी?? तुमच्या जात-धर्मामुळे कित्येक मने तुटलेली पाहिलं आहे. या देशाच्या कित्येक पिढ्याच या जाती-धर्म वाल्यांनी प्रेमाच्या बाजून वाटोळा करून टाकलं आहे. एक लक्षात घ्या एकावर प्रेम आणि जातीच्या नावाने दुसर्याशी लग्न हा बदफैलीपणा आहे.
सगळ्याच्या सगळ्या जाती क्रूर आणि विकृत झाल्या आहे. तुमच्या जातीधर्माच्या अस्मिता स्त्री देहावर नका बघू हो.. तुम्ही फार किळसवाना वागत आहात.. पुरुषाची जात काहीही असली तरी चालेल पुरुषाने दुसऱ्या जाती-धर्माच्या बाईशी लग्न केलं तरी चालेल फक्त स्त्री ने ते करू नये हे जे तुमच्या अस्मितीचे खेळ चालू आहे हे बंद करा हो... स्त्री ला कृपया माणूस म्हणून कबुल करा हो तिला ही मन असतं मेंदू असतों शरीर असतं तिला स्वतंत्र्य द्या माणूस म्हणून जगण्याचं !!
विचार- राजन खान सर
धन्यवाद- आयबीन लोकमत
सदर लेख हा  इथुन संकलीत केला आहे

जातनिर्मूलन

आज सकाळी दूध घ्यायला भय्याकडे गेलो.. तिकडे एक दारुडा उभा होता तो बहुतेक त्या भय्यांचा मित्र असावा.. त्या दारुड्याच्या डोक्याला लागलें होते पट्टी बांधली होती तरी रक्त टपकत होतं... भय्यां त्या दारुड्या ला म्हणाला.. जो दारू पिता ना वो कभी सुखी नही रहेता... त्याला भय्यां म्हणाला कितने बेटे हें? दारुडा म्हणाला २... भय्यां म्हणाला शादी हुई होगी.. बहू-लाडके अलग हुये होंगे?? दारुड्याने मान डोलवून होकारअर्थी मान डोलवली... भय्यां म्हणाला देखा उपरवाले की लकडी का आवाज नही होता.. मी शांतपणे गप्पा ऐकत होतो... पुढे भय्यां दारुड्याला म्हणाला तुम्हे लडकी हे?? दारुडा हो म्हणाला.. १ लडकी हें.. *भय्यां म्हणाला लडकी की शादी करनी हे क्या?? एक मारवाडी हे.. बहोत पैसे और खेती हें.. अच्छा काम हे लडका मेहनती हें... तुम्हारे लडकी के नाम प्लांट करेगा तब करना शादी.. वो तुम्हे दहेज भी देगा.. दारुडा शांतपणे ऐकत होता.. मग भय्यां माझ्याकडे बघून म्हणाला.. वो क्या हे ना मारवाडी मे लडकी नी मिलती हे भाई.. वैसे भी लडकी अपने घर आई की वो अपनी हो जाती हे.. बराबर ना... मी एक स्माईल दिली आणि निघालो.. मनात विचार आला अश्याच जाती संपणार निदान मनातून तरी जातनिर्मूलन होईल !!
प्रबोधन- जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया's photo.
सदर लेख हा  इथुन संकलीत केला आहे

Thursday 16 April 2015

कुठे आहे आंबेडकरी चळवळ?

राजकारण हे सत्तेसाठी करायचे असते, हे ठीक, परंतु सत्ता कशासाठी त्याचाही एक विचार व दिशा असायला पाहिजे. सत्तेचे राजकारण करीत असताना, आपली वेगळी ओळख पुसली जाणार नाही, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.. 
                                         
समग्र आंबेडकरी चळवळीचा विचार बुद्ध-फुले-कबीर-शाहू-आंबेडकर या विचारधारेच्या निकषांवर करावा लागेल. वर्तमानकाळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थितीच्या विश्लेषणाच्या अंगानेही त्याचा विचार करावा लागेल. त्यातही राजकारणाने जीवनाची सारीच क्षेत्रे झाकोळलेली आहेत, म्हणून राजकारणाचे विश्लेषण करताना त्यात आंबेडकरी राजकारणाचे स्थान कोणते? याचाही विचार होणे स्वाभाविक आहे. देशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वेगळेच राजकीय परिवर्तन घडून आले. सांस्कृतिक पायावर उभे असलेल्या व उघडपणे स्वीकारलेल्या धर्माधिष्ठित राजकारणाचा पहिल्यांदा पूर्ण विजय झाला. भारतात कोणत्याही प्रकारच्या व स्वरूपातल्या धर्माधिष्ठित राजकारणाला विरोध करणारे राजकीय विचारप्रवाह अस्तित्वात आहेत. त्यातील आंबेडकरी राजकारणाचा विचारप्रवाह प्रखर व ताकदवान मानला जातो. पण आज तो तसा आहे का?
या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. त्याची कारणे अनेक असली तरी, त्यातील दोन कारणे महत्त्वाची वाटतात. नेतृत्वाची मर्यादा व दुसरे प्रस्थापितांचे विरोधी विचार नष्ट करण्याचे किंवा काबूत ठेवण्याचे डावपेच. नव्याने उभ्या राहिलेल्या परिस्थितीचे आकलन करून घेण्याच्या क्षमतेचा अभाव किंवा उदासीनता, संघटनेची ताकद उभी करण्यापेक्षा, सवतेसुभे मांडून राजकीय सौदेबाजी करून सत्तेची चव चाखण्याची अभिलाषा, ज्याचे प्रतिनिधित्व करायचे आहे त्या दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, भूमिहीन शेतमजूर, गरीब-कष्टकरी माणूस यांच्या भौतिक समस्यांवर आंदोलने उभी करण्यापेक्षा भावनिक प्रश्नांभोवती चळवळ फिरवत ठेवणे इत्यादी नेतृत्वाशी संबंधित कारणे आहेत.  
बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाच्या नावाने एक मोठा राजकीय आवाका घेण्याचा प्रयत्न झाला. तो जरी अल्पजीवी ठरला तरी, आंबेडकरी राजकारणाचा अजेंडा व दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी कूळ कायद्याची चर्चा होत असताना कसेल त्याची जमीन, परंतु नसेल त्याचे काय, असा प्रश्न त्या वेळच्या रिपब्लिकन नेतृत्वाने उपस्थित करून साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. त्याच घोषणेतून १९६० ते ७० च्या दशकात राजकीय व्यवस्थेला आंबेडकरी राजकरणाची दखल घ्यायला भाग पाडणारे दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अभूतपूर्व असा  भूमिहीनांचा सत्याग्रह झाला होता. तो अपवाद वगळला तर, आंबेडकरी चळवळीची वाटचाल भावनिक व अस्मितेच्या राजकारणाच्या दिशेने जाताना दिसते. काही काळ दलित पँथरने झंझावात निर्माण केला. दलितांवरील अन्याय-अत्याचाराच्या प्रखर प्रतिकाराबरोबरच, धार्मिक व सामाजिक विषम व्यवस्थेविरुद्धचे पँथरचे ते बंड होते. काळाची गरज पँथरने भागविली म्हणता येईल, परंतु काळाच्या बरोबर चालण्यात ती यशस्वी झाली का? पुढे १९७८ ते १९९४ अशी तब्बल १६ वर्षे नामांतराच्या प्रश्नाभोवती चळवळ फिरत राहिली. नामविस्ताराच्या तडजोडीने नामांतरचा प्रश्न संपवला गेला, त्यानंतर आंबेडकरी चळवळीची दाहकता कमीकमी होत गेली. नेतृत्वाने सत्तेच्या राजकरणाकडे आपला मोर्चा वळविला. त्यातून गटबाजी, सौदेबाजी, फरपट आणि तराळीकचे म्हणजे शरणागतीचे राजकारण सुरू झाले. शरणागतीबद्दल बाबासाहेबांचे फार मौलिक व मार्मिक उद्गार आहेत. ते म्हणतात, शरणागती म्हणजे एक आपत्तीच आहे. तिच्याइतकी दुसरी मोठी आपत्ती कोणतीच असू शकणार नाही. कारण ती मानसिक गुलामगिरी आहे आणि मानसिक गुलमागिरीत जे लोक सापडतात त्यांची प्रगती खुंटली जाते, याची साक्ष साऱ्या जगाचा इतिहास आहे. (अग्रलेख- जनता, ११ मे १९४१).
राजकारण हे सत्तेसाठी करायचे असते, हे ठीक, परंतु सत्ता कशासाठी त्याचाही एक विचार व दिशा असायला पाहिजे. सत्तेचे राजकारण करीत असताना, आपली वेगळी ओळख पुसली जाणार नाही, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळ हा एक विचारप्रवाह असेल तर, मग त्या आधारने राजकारण करताना मित्र कोण व शत्रू कोण याचीही आखणी करणे स्वाभाविक ठरते. 
  भ्रष्टाचार, महागाई ही काही एखाद्या राजकीय पक्षाशी हातमिळवणी करण्यासाठी राजकीय विचारसरणी होऊ शकत नाही. सरकारच्या धोरणातील ते वाईट पारिणाम आहेत. याचा अर्थ आंबेडकरी चळवळीने महागाई, भ्रष्टाचार या प्रश्नांना स्पर्श करू नये, असे नाही, परंतु संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाचा आग्रह धरणाऱ्या आंबेडकरी विचारधारेचे राजकारण तात्कालिक मुद्दय़ांवर केंद्रित करून तिची तात्त्विक भूमिका मोडीत काढणे धोक्याचे आहे. 
नामांतराच्या आंदोलनानंतर राजकीय सत्तेच्या मागे धावणारे नेतृत्व सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा विचार देऊ शकले नाही. शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हाच एकमेव प्रगतीचा मार्ग मागास वर्गासमोर आहे.  परंतु एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या किती तर दोन ते चार टक्के आहेत. त्यातून या समाजाच्या प्रगतीला किती काळ लागेल? ६० वर्षांनंतर समाजाची काय अवस्था आहे. ग्रामीण भागातील दलित, आदिवासी, ओबीसींच्या पन्नास घरांत सरासरी पाच कुटुंबांत शिक्षण व नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ झाल्याचे दिसते. देशातील सर्व शहरांमधील झोपडपट्टय़ांचा सव्‍‌र्हे केला, तर अशा बकाल वस्त्यांमध्ये राहणारा वर्ग कोणता आहे, हे जाणून घेतल्यानंतर, केवळ आरक्षणाने आणखी पुढील पन्नास-शंभर वर्षांत तरी या समाजाची प्रगती होईल की नाही, याबद्दलची शंका आल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाने प्रगतीसाठी किती काळ लागेल, याचा थांगपत्ता नाही आणि आरक्षण हा अमरपट्टा आहे का? आरक्षणाबरोबरच मागासांच्या आर्थिक विकासाचा मार्ग कोणता, याचा विचार केला जात असल्याचे दिसत नाही. देशातील दलित समाज हा अत्यल्पभूधारक किंवा जास्त करून भूमिहीनच आहे. पडीक किंवा गायरान जमिनी भूमिहीनांना देण्याच्या सरकारी योजना फक्त कागदावरच राहतात. अनेक योजना तशाच आहेत. त्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे, त्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. दलित-आदिवासी समाजाच्या योजनांमधील भ्रष्टाचाराबद्दल आंबेडकरी चळवळीने कधी आवाज उठवला आहे का?  राज्याच्या अर्थसंकल्पात या दोन समाजांसाठी  १० हजार कोटी रुपयांची एका वर्षांसाठी तरतूद असते, त्याची चळवळीला कल्पना आहे का आणि एवढा मोठा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न कधी कुणाला पडला आहे का? आरक्षणामुळे सरकारी नोक ऱ्यांमधून फार तर दहा-पंधरा टक्के समाजाचा काही प्रमाणात विकास झाला असेल, परंतु ८५-९० टक्के समाजाच्या हातात उत्पादनाचे साधन काय? त्यासाठी आंबेडकरी चळवळीचा अजेंडा काय आहे?
आता पुन्हा आंबेडकरी चळवळ स्मारके व अस्मितेभोवती फिरू लागली आहे. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या मागणीवर आंदोलने सुरू झाली. सत्ताधारी कुणीही असो काँग्रेस अथवा भाजप त्यांनी या आंदोलनात स्वत:ची राजकीय सोय बघितली. अशी भावनिक आंदोलने प्रस्थापितांना हवीच असतात. भावनेभोवती चळवळ, समाज फिरवत ठेवणे हे त्यांच्या फायद्याचे असते. समाज पर्विन व राष्ट्र उभारणीसाठी विभूतिपूजा घातक असते, असे बाबासाहेब मानत. एका वेगळ्यासंदर्भात जॉर्ज वॉशिंग्टनचे उदाहरण त्यांनी दिले आहे. अमेरिकेची घटना लिहून पूर्ण झाल्यानंतर वॉशिंग्टन यांना पहिले अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. परंतु मुदत संपल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला, त्या वेळी त्यांना देवासमान मानणाऱ्या अमेरिकन लोकांना त्यांनीच अध्यक्ष झाले पाहिजे असा आग्रह धरला. त्या वेळी वॉशिंग्टन आपल्या जनतेला उद्देशून म्हणाले, माझ्या प्रिय देशबंधूंनो, आपल्याला वंशपरंपरेने येणारा राजा, राजेशाही किंवा हुकूमशहा नको होता म्हणूनच ही घटना बनविली, त्याचा तुम्हाला विसर पडल्याचे दिसते. माझी पूजा करून मला जर वर्षांनुवर्षे अध्यक्ष बनवू लागलात तर तुमच्या तत्त्वाचे काय होईल, इंग्लिश राजाच्या ठिकाणी माझी स्थापना करून तुम्ही असे म्हणू शकाल काय की इंग्लिश राजाच्या सत्तेविरुद्ध तुम्ही केलेला उठाव योग्य होता, तसे तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणू शकाल? बाबासाहेबांनी विभूतिपूजेसंदर्भात वॉशिंग्टनचे दिलेले उदाहरण परखड व बोलके आहे. अर्थात इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक झालेच पाहिजे. ते समता, स्वातंत्र्य, बंधुभावाचे स्फूर्तिस्थान असेल, परंतु आंबेडकरी चळवळीचा हा एकमेव कार्यक्रम असू नये. जातीमुक्त समाज निर्माण करणे, सर्व प्रकारची विषमता नष्ट करणे हे आंबेडकरी चळवळीचे मुख्य ध्येय असले पाहिजे, त्यासाठी धर्मव्यवस्थेसह जात नाकारणाऱ्यांची संख्या चळवळीत वाढविली पाहिजे. आंबेडकरी चळवळीने जन्माधिष्ठित मित्र व शत्रू ठरवणे घातक ठरेल, अशा प्रकारच्या चातुर्वण्र्य विचाराच्या प्रचारकांना जाणीवपूर्वक दूर ठेवले पाहिजे. हे सर्व आंबेडकरी चळवळीबद्दलच्या आदर्श अपेक्षा झाल्या. परंतु आज या चळवळीची नेमकी अवस्था काय आहे?  सामाजिक शक्तीच्या शोककारक अवस्थेबद्दल बाबासाहेबांनी एका भाषणात थायर या लेखकाचे विचार उद्धृत केले आहेत. ते असे, प्रत्येक पंथ, पक्ष किंवा संस्थेत अशी एक स्थिती येते की जेव्हा तिची वाढ खुंटते. तिच्या नाडय़ा थंड पडलेल्या असतात. तिचा तरुणांसमोर आदर्श उरत नाही. तिच्या पोक्त पुरुषांना आशेची स्वप्ने दिसत नाहीत. ती केवळ तिच्या भूतकाळावर जगत असते आणि भूतकाळ तसाच राहावा म्हणून ती प्राणपणाने प्रयत्न करीत असते. राजकारणात जेव्हा ही कठोरतेची स्थिती पूर्णतेस पोहोचते तेव्हा त्याला आपण दुर्दम्य गतानुगतिकता असे म्हणतो. ही दुर्गम्य गतानुगतिका ओळखण्याची मुख्य खूण अशी की दृष्टिभंग झाल्यामुळे व जाणीवशून्य झाल्यामुळे तिच्या उपचाराचीही आवश्यकता त्यांना वाटत नाही. स्वत:मध्ये बदल करून बदलत्या व नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरल्यामुळे एखाद्या म्हाताऱ्या माणसाने आपले अंग जुन्या आरामखुर्चीत झोकून द्यावे, त्याचप्रमाणे असा समाज भूतकाळात फेकला जातो. आंबेडकरी चळवळ आज कुठे व कोणत्या अवस्थेत उभी आहे, हे जाणून घेण्यासाठी १९४३ साली बाबासाहेबांनी केलेल्या एका भाषणातील हे उदाहरण पुरेसे ठरू शकेल.१४ एप्रिल)  आंबेडकरी चळवळीची ही मीमांसा..
समग्र आंबेडकरी चळवळीचा विचार बुद्ध-फुले-कबीर-शाहू-आंबेडकर या विचारधारेच्या निकषांवर करावा लागेल. वर्तमानकाळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थितीच्या विश्लेषणाच्या अंगानेही त्याचा विचार करावा लागेल. त्यातही राजकारणाने जीवनाची सारीच क्षेत्रे झाकोळलेली आहेत, म्हणून राजकारणाचे विश्लेषण करताना त्यात आंबेडकरी राजकारणाचे स्थान कोणते? याचाही विचार होणे स्वाभाविक आहे. देशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वेगळेच राजकीय परिवर्तन घडून आले. सांस्कृतिक पायावर उभे असलेल्या व उघडपणे स्वीकारलेल्या धर्माधिष्ठित राजकारणाचा पहिल्यांदा पूर्ण विजय झाला. भारतात कोणत्याही प्रकारच्या व स्वरूपातल्या धर्माधिष्ठित राजकारणाला विरोध करणारे राजकीय विचारप्रवाह अस्तित्वात आहेत. त्यातील आंबेडकरी राजकारणाचा विचारप्रवाह प्रखर व ताकदवान मानला जातो. पण आज तो तसा आहे का?
या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. त्याची कारणे अनेक असली तरी, त्यातील दोन कारणे महत्त्वाची वाटतात. नेतृत्वाची मर्यादा व दुसरे प्रस्थापितांचे विरोधी विचार नष्ट करण्याचे किंवा काबूत ठेवण्याचे डावपेच. नव्याने उभ्या राहिलेल्या परिस्थितीचे आकलन करून घेण्याच्या क्षमतेचा अभाव किंवा उदासीनता, संघटनेची ताकद उभी करण्यापेक्षा, सवतेसुभे मांडून राजकीय सौदेबाजी करून सत्तेची चव चाखण्याची अभिलाषा, ज्याचे प्रतिनिधित्व करायचे आहे त्या दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, भूमिहीन शेतमजूर, गरीब-कष्टकरी माणूस यांच्या भौतिक समस्यांवर आंदोलने उभी करण्यापेक्षा भावनिक प्रश्नांभोवती चळवळ फिरवत ठेवणे इत्यादी नेतृत्वाशी संबंधित कारणे आहेत.  
बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाच्या नावाने एक मोठा राजकीय आवाका घेण्याचा प्रयत्न झाला. तो जरी अल्पजीवी ठरला तरी, आंबेडकरी राजकारणाचा अजेंडा व दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी कूळ कायद्याची चर्चा होत असताना कसेल त्याची जमीन, परंतु नसेल त्याचे काय, असा प्रश्न त्या वेळच्या रिपब्लिकन नेतृत्वाने उपस्थित करून साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. त्याच घोषणेतून १९६० ते ७० च्या दशकात राजकीय व्यवस्थेला आंबेडकरी राजकरणाची दखल घ्यायला भाग पाडणारे दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अभूतपूर्व असा  भूमिहीनांचा सत्याग्रह झाला होता. तो अपवाद वगळला तर, आंबेडकरी चळवळीची वाटचाल भावनिक व अस्मितेच्या राजकारणाच्या दिशेने जाताना दिसते. काही काळ दलित पँथरने झंझावात निर्माण केला. दलितांवरील अन्याय-अत्याचाराच्या प्रखर प्रतिकाराबरोबरच, धार्मिक व सामाजिक विषम व्यवस्थेविरुद्धचे पँथरचे ते बंड होते. काळाची गरज पँथरने भागविली म्हणता येईल, परंतु काळाच्या बरोबर चालण्यात ती यशस्वी झाली का? पुढे १९७८ ते १९९४ अशी तब्बल १६ वर्षे नामांतराच्या प्रश्नाभोवती चळवळ फिरत राहिली. नामविस्ताराच्या तडजोडीने नामांतरचा प्रश्न संपवला गेला, त्यानंतर आंबेडकरी चळवळीची दाहकता कमीकमी होत गेली. नेतृत्वाने सत्तेच्या राजकरणाकडे आपला मोर्चा वळविला. त्यातून गटबाजी, सौदेबाजी, फरपट आणि तराळीकचे म्हणजे शरणागतीचे राजकारण सुरू झाले. शरणागतीबद्दल बाबासाहेबांचे फार मौलिक व मार्मिक उद्गार आहेत. ते म्हणतात, शरणागती म्हणजे एक आपत्तीच आहे. तिच्याइतकी दुसरी मोठी आपत्ती कोणतीच असू शकणार नाही. कारण ती मानसिक गुलामगिरी आहे आणि मानसिक गुलमागिरीत जे लोक सापडतात त्यांची प्रगती खुंटली जाते, याची साक्ष साऱ्या जगाचा इतिहास आहे. (अग्रलेख- जनता, ११ मे १९४१).
राजकारण हे सत्तेसाठी करायचे असते, हे ठीक, परंतु सत्ता कशासाठी त्याचाही एक विचार व दिशा असायला पाहिजे. सत्तेचे राजकारण करीत असताना, आपली वेगळी ओळख पुसली जाणार नाही, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळ हा एक विचारप्रवाह असेल तर, मग त्या आधारने राजकारण करताना मित्र कोण व शत्रू कोण याचीही आखणी करणे स्वाभाविक ठरते. 
  भ्रष्टाचार, महागाई ही काही एखाद्या राजकीय पक्षाशी हातमिळवणी करण्यासाठी राजकीय विचारसरणी होऊ शकत नाही. सरकारच्या धोरणातील ते वाईट पारिणाम आहेत. याचा अर्थ आंबेडकरी चळवळीने महागाई, भ्रष्टाचार या प्रश्नांना स्पर्श करू नये, असे नाही, परंतु संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाचा आग्रह धरणाऱ्या आंबेडकरी विचारधारेचे राजकारण तात्कालिक मुद्दय़ांवर केंद्रित करून तिची तात्त्विक भूमिका मोडीत काढणे धोक्याचे आहे. 
नामांतराच्या आंदोलनानंतर राजकीय सत्तेच्या मागे धावणारे नेतृत्व सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा विचार देऊ शकले नाही. शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हाच एकमेव प्रगतीचा मार्ग मागास वर्गासमोर आहे.  परंतु एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या किती तर दोन ते चार टक्के आहेत. त्यातून या समाजाच्या प्रगतीला किती काळ लागेल? ६० वर्षांनंतर समाजाची काय अवस्था आहे. ग्रामीण भागातील दलित, आदिवासी, ओबीसींच्या पन्नास घरांत सरासरी पाच कुटुंबांत शिक्षण व नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ झाल्याचे दिसते. देशातील सर्व शहरांमधील झोपडपट्टय़ांचा सव्‍‌र्हे केला, तर अशा बकाल वस्त्यांमध्ये राहणारा वर्ग कोणता आहे, हे जाणून घेतल्यानंतर, केवळ आरक्षणाने आणखी पुढील पन्नास-शंभर वर्षांत तरी या समाजाची प्रगती होईल की नाही, याबद्दलची शंका आल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाने प्रगतीसाठी किती काळ लागेल, याचा थांगपत्ता नाही आणि आरक्षण हा अमरपट्टा आहे का? आरक्षणाबरोबरच मागासांच्या आर्थिक विकासाचा मार्ग कोणता, याचा विचार केला जात असल्याचे दिसत नाही. देशातील दलित समाज हा अत्यल्पभूधारक किंवा जास्त करून भूमिहीनच आहे. पडीक किंवा गायरान जमिनी भूमिहीनांना देण्याच्या सरकारी योजना फक्त कागदावरच राहतात. अनेक योजना तशाच आहेत. त्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे, त्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. दलित-आदिवासी समाजाच्या योजनांमधील भ्रष्टाचाराबद्दल आंबेडकरी चळवळीने कधी आवाज उठवला आहे का?  राज्याच्या अर्थसंकल्पात या दोन समाजांसाठी  १० हजार कोटी रुपयांची एका वर्षांसाठी तरतूद असते, त्याची चळवळीला कल्पना आहे का आणि एवढा मोठा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न कधी कुणाला पडला आहे का? आरक्षणामुळे सरकारी नोक ऱ्यांमधून फार तर दहा-पंधरा टक्के समाजाचा काही प्रमाणात विकास झाला असेल, परंतु ८५-९० टक्के समाजाच्या हातात उत्पादनाचे साधन काय? त्यासाठी आंबेडकरी चळवळीचा अजेंडा काय आहे?
आता पुन्हा आंबेडकरी चळवळ स्मारके व अस्मितेभोवती फिरू लागली आहे. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या मागणीवर आंदोलने सुरू झाली. सत्ताधारी कुणीही असो काँग्रेस अथवा भाजप त्यांनी या आंदोलनात स्वत:ची राजकीय सोय बघितली. अशी भावनिक आंदोलने प्रस्थापितांना हवीच असतात. भावनेभोवती चळवळ, समाज फिरवत ठेवणे हे त्यांच्या फायद्याचे असते. समाज पर्विन व राष्ट्र उभारणीसाठी विभूतिपूजा घातक असते, असे बाबासाहेब मानत. एका वेगळ्यासंदर्भात जॉर्ज वॉशिंग्टनचे उदाहरण त्यांनी दिले आहे. अमेरिकेची घटना लिहून पूर्ण झाल्यानंतर वॉशिंग्टन यांना पहिले अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. परंतु मुदत संपल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला, त्या वेळी त्यांना देवासमान मानणाऱ्या अमेरिकन लोकांना त्यांनीच अध्यक्ष झाले पाहिजे असा आग्रह धरला. त्या वेळी वॉशिंग्टन आपल्या जनतेला उद्देशून म्हणाले, माझ्या प्रिय देशबंधूंनो, आपल्याला वंशपरंपरेने येणारा राजा, राजेशाही किंवा हुकूमशहा नको होता म्हणूनच ही घटना बनविली, त्याचा तुम्हाला विसर पडल्याचे दिसते. माझी पूजा करून मला जर वर्षांनुवर्षे अध्यक्ष बनवू लागलात तर तुमच्या तत्त्वाचे काय होईल, इंग्लिश राजाच्या ठिकाणी माझी स्थापना करून तुम्ही असे म्हणू शकाल काय की इंग्लिश राजाच्या सत्तेविरुद्ध तुम्ही केलेला उठाव योग्य होता, तसे तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणू शकाल? बाबासाहेबांनी विभूतिपूजेसंदर्भात वॉशिंग्टनचे दिलेले उदाहरण परखड व बोलके आहे. अर्थात इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक झालेच पाहिजे. ते समता, स्वातंत्र्य, बंधुभावाचे स्फूर्तिस्थान असेल, परंतु आंबेडकरी चळवळीचा हा एकमेव कार्यक्रम असू नये. जातीमुक्त समाज निर्माण करणे, सर्व प्रकारची विषमता नष्ट करणे हे आंबेडकरी चळवळीचे मुख्य ध्येय असले पाहिजे, त्यासाठी धर्मव्यवस्थेसह जात नाकारणाऱ्यांची संख्या चळवळीत वाढविली पाहिजे. आंबेडकरी चळवळीने जन्माधिष्ठित मित्र व शत्रू ठरवणे घातक ठरेल, अशा प्रकारच्या चातुर्वण्र्य विचाराच्या प्रचारकांना जाणीवपूर्वक दूर ठेवले पाहिजे. हे सर्व आंबेडकरी चळवळीबद्दलच्या आदर्श अपेक्षा झाल्या. परंतु आज या चळवळीची नेमकी अवस्था काय आहे?  सामाजिक शक्तीच्या शोककारक अवस्थेबद्दल बाबासाहेबांनी एका भाषणात थायर या लेखकाचे विचार उद्धृत केले आहेत. ते असे, प्रत्येक पंथ, पक्ष किंवा संस्थेत अशी एक स्थिती येते की जेव्हा तिची वाढ खुंटते. तिच्या नाडय़ा थंड पडलेल्या असतात. तिचा तरुणांसमोर आदर्श उरत नाही. तिच्या पोक्त पुरुषांना आशेची स्वप्ने दिसत नाहीत. ती केवळ तिच्या भूतकाळावर जगत असते आणि भूतकाळ तसाच राहावा म्हणून ती प्राणपणाने प्रयत्न करीत असते. राजकारणात जेव्हा ही कठोरतेची स्थिती पूर्णतेस पोहोचते तेव्हा त्याला आपण दुर्दम्य गतानुगतिकता असे म्हणतो. ही दुर्गम्य गतानुगतिका ओळखण्याची मुख्य खूण अशी की दृष्टिभंग झाल्यामुळे व जाणीवशून्य झाल्यामुळे तिच्या उपचाराचीही आवश्यकता त्यांना वाटत नाही. स्वत:मध्ये बदल करून बदलत्या व नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरल्यामुळे एखाद्या म्हाताऱ्या माणसाने आपले अंग जुन्या आरामखुर्चीत झोकून द्यावे, त्याचप्रमाणे असा समाज भूतकाळात फेकला जातो. आंबेडकरी चळवळ आज कुठे व कोणत्या अवस्थेत उभी आहे, हे जाणून घेण्यासाठी १९४३ साली बाबासाहेबांनी केलेल्या एका भाषणातील हे उदाहरण पुरेसे ठरू शकेल.

सदर लेख इथुन संकलीत केला आहे.

आजचे देशातील चित्र बाबासाहेबांना अभिप्रेत होते का?

                                      
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती. त्यांनी स्वत: घेतलेल्या विविध तात्त्विक भूमिका आणि या भूमिकांना आजच्या काळात मिळत असलेला छेद यांचा हा परामर्ष.
भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो, त्यामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली भारताची राज्यघटना आहे, हे निश्चित. त्यांनी लोकशाहीत तत्त्वज्ञान ओतले. देशातील संपत्तीचे न्याय्य आणि समान व्हावे, विषमता दूर व्हावी असा त्यांचा तात्त्विक आग्रह होता आणि खाजगी उद्योग हे करू शकत नसल्याने सरकारचे नियंत्रण त्यांच्या मते गरजेचे होते.
देशापुढे उत्पादनात वेगाने प्रगती करणारी आर्थिक योजना हवी, कळीचे उद्योग सरकारकडे हवेत आणि औद्योगिकरण व शेतीसाठी भांडवल पुरविल्याशिवाय त्यामध्ये वेगाने प्रगती होऊ शकणार नाही, असा त्यांचा आग्रह होता. भांडवलासाठी विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण त्यांनी आवश्यक मानले. राज्यशासित समाजवाद आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो, घटना ही राज्यशासित समाजवाद निर्माण करते, कोणतेही सरकार आले तरी ते त्यात बदल करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या विचारांच्या समर्थनार्थ बाबासाहेब लोकशाहीचे पुढील तत्त्वज्ञान मांडतात. १) राजकीय लोकशाहीमध्ये व्यक्ती ही अंतत: प्रमुख आहे. २) कोणालाही काढून घेता येणार नाहीत असे तिला मूलभूत अधिकार आहेत. ३) कोठलाही लाभ मिळण्यासाठी व्यक्तीला हे अधिकार सोडावे लागता कामा नये. ४) कोठल्याही खाजगी व्यक्तीला दुसऱ्यावर हुकुमत गाजविण्याचे अधिकार सरकार देणार नाही.
थोडक्यात, मूलभूत अधिकार, आर्थिक स्वातंत्र्य, देशातील संपत्तीचे न्याय्य समान वाटप, संसदीय लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बधुभाव अशा सर्व तात्त्विक बाबींना एकत्र गुंफण्याचे जे विवेचन बाबासाहेबांनी केले, ते किती तर्कशुद्ध आहे हे सहज लक्षात येते. पुढे बाबासाहेब असेही म्हणतात की, सरकारचे नियंत्रण जर यामधून काढून घेतले तर उरते ती खाजगी उद्योजकांची हुकूमशाही.
एक इशारा देताना, बाबासाहेब म्हणतात, आर्थिक स्वातंत्र्य दिले नाही तर लोक घटना ठिकाणावर ठेवणार नाहीत. याला अनुसरून घटनेमधील त्यांच्या काही तरतुदी बघा. १) उपोद्घातामध्ये आर्थिक स्वातंत्र्याचा अंतर्भाव. २) कामगार कष्टकऱ्यांना न्यायासाठी व अन्यायाविरोधात युनियन करण्याचा मूलभूत हक्क. (कलम १९-३)
३) सरकारने कोणते धोरण राबवावे याच्या मार्गदर्शनार्थ मार्गदर्शक तत्त्वे. ४) लोकांच्या कल्याणासाठी सरकार खूप झटेल. देशभर हा संदेश गेला पाहिजे. (कलम ३८)
५) मूठभर लोकांच्या हातात देशातील संपत्ती व उत्पादनाची साधने एकवटणार नाही हे सरकार बघेल. सामान्यांचे हाल होणार नाही. अशी अर्थ व्यवस्था सरकार करेल. (कलम ३९ सी) ६) कामगार कष्टकऱ्यांना चांगले जीवन जगता येईल असे वेतन दिले पाहिजे. (कलम ४३)
बाबासाहेबांचे वरील मौलिक विचार व आर्थिक स्वातंत्र्य सरकारने दिले नाही तर घटनेने बांधलेला लोकशाहीचा मनोरा कोलमडून पडेल हा इशारा बघता देशातील आजच्या परिस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक आहे.
विषमता : फोर्बस्च्या यादीप्रमाणे देशात १०० लोक सर्वाधिक श्रीमंत म्हणजे बिलियनर्स आहेत. (एक बिलियन म्हणजे ६२०० कोटी रुपये.) क्रेडिट सुइझे यांच्या जागतिक संपत्ती अहवालाप्रमाणे देशातील एक टक्का घरांमध्ये ४९% संपत्ती आहे, तर ग्रामीण भागातील ८०% लोक दररोज दरडोई पन्नास रुपयांहून कमी खर्च करतात. लाखोंच्या संख्येत शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत. कोट्यवधी कामगारांच्या हातांना काम नाही आणि त्याचवेळी यावर्षी सरकारने ५.३२ लाख कोटी कॉर्पोरेटसना कर सवलतीत दिले. हे आहे विषमतेचे विदारक चित्र !
लोकशाही संदर्भात बोलायचे तर एशियन फॉर डेमॉक्रसीने दिलेल्या अहवालानुसार २०१४च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातील पहिल्या तीन उमेदवारांनी प्र्रत्येकी पाच कोटी खर्च केले. एकूण उमेदवारांचा खर्च किमान दहा बारा हजार कोटींवर आहे. प्रतिष्ठेच्या एकट्या वाराणसीत तर २५ ते ३० हजार कोटी खर्च झाल्याचे वृत्त आहे. ही जगातली सर्वात महागडी निवडणूक होती. एवढा पैसा कोठून येतो व कोठून आला हा कळीचा प्रश्न आहे. देशाचे संसद सभागृह ४४२ कोट्यधीशांनी गजबजलेले आहे. कॉर्पोरेटसचे हेर सरकारच्या कॉरिडॉरमध्ये जाऊन पोहोचलेतसुद्धा ! प्रश्न असा आहे की हे तुफानी चित्र बाबासाहेबांना अभिप्रेत होते का? निवडणुकांमध्ये पक्षातर्फे होणाऱ्या खर्चावर काहीच बंधने नाहीत. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी म्हटल्याप्रमाणे कॉर्पोरेटस व मीडियाने, २०१४ निवडणुकीत उच्छादच मांडला होता.
देशहिताच्या दृष्टिकोनातून या गोष्टी देशाला परवडणाऱ्या आहेत का? कॉर्पोरेटस व मीडिया यांच्या हस्तक्षेपावर आवश्यक नियमावली दिसत नाही. त्यामुळेही निवडणूक सुधारणा हा विषय देशाच्या ऐरणीवर आला आहे. निवडणूक निकालामध्ये मतदाराच्या कौलाचे खरे प्रतिबिंब पडण्यासाठी नागरिकांनी मतदान केले पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला मौलिक मताचा अधिकार, सुजाणतेने वापरला पाहिजे. लोकशाहीच्या प्रति आपले कर्तव्य बजावणे म्हणजे देशाप्रती कर्तव्य बजावणे होय. डॉ. बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करताना या मुद्द्यांवर सगळ्यांनीच चिंतन करणे गरजेचे आहे.



सदर लेख हा  इथुन संकलीत केला आहे.

Monday 9 March 2015

छत्रपती शिवाजी महाराज- मुत्सद्दी व उदारमतवादी

छत्रपती शिवाजी महाराज राजकारणी होते. पण त्यांचे राजकारण कोणत्या विचारांचे होते? महाराजांच्या जीवनातील घटना, प्रसंग पाहिले, तर त्यांना जात, धर्म, प्रांत, भाषेचे राजकारण अभिप्रेत होते काय? महाराजांचे राजकारण मुस्लिमद्वेष्टे किंवा हिंदूधार्जिणे कधीच नव्हते, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन असे होते. अफजलखानाच्या वधानंतर शिवरायांनी त्याच्या कुटुंबाला कसे अभय दिले, याचे वर्णन शिवरायांच्या दरबारातील सदस्य कृष्णाजी अनंत सभासदाने पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘ऐसी फत्ते करून जय जाहाला. मग राजे यांनी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते त्यांस धरून आणिले. राजा खासा प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफजलखानाचे लोक व त्यांचे पुत्र भांडते माणूस होते तितकियांस भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लेकांस चालविले.’’ खानाला धडा शिकविल्यानंतर शिवरायांनी त्याच्या मुलांना प्रेमाने वागविले. त्यांना पोटाशी धरून अभय दिले व त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावून दिली.

मोगलांनी विजापूरला वेढा घातला, तेव्हा त्यांच्या दक्षिणेतील राजकारणाला पायबंद घालण्यासाठी शिवरायांनी आदिलशहाच्या मदतीसाठी दहा हजार घोडेस्वार आणि धान्याच्या गोण्यांसह दहा हजार बैल रवाना केले. दिलेरखानाच्या छावणीतून संभाजीराजांची सुटका झाल्यानंतर ते प्रथम विजापूरला गेले आणि तेथून पन्हाळगडावर आले. त्यासाठी आदिलशहाने साह्य केले. दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर मोगल सुभेदार बहादूरखान स्वराज्याला उपद्रव देणार नाही, याची व्यवस्था शिवाजीराजांनी त्याच्याशी अंतर्गत तह करून केली होती. यावरून स्पष्ट होते, की राजांचा मोगल- आदिलशहाशी असणारा संघर्ष राजकीय होता, धार्मिक नव्हता. राजे दक्षिण दिग्विजयासाठी निघाले असता गोवळकोंडा जवळ आल्यानंतर त्यांनी मावळ्यांना सांगितले, की ‘एक काडी रयतेची तसनस न व्हावी.’ म्हणजे रयतेच्या काडीचीही नासाडी करू नका. परमुलूखातील सामान्य रयतेचेही हित शिवरायांनी जोपासले. ही वार्ता ऐकून गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने शिवरायांच्या स्वागतासाठी चार गावे पुढे येण्याचे ठरवले. तेव्हा राजांनी त्याला कोणता निरोप पाठवला, याचे हृदयस्पर्शी वर्णन समकालीन सभासदाने पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘तुम्ही न येणे. आपण वडीलभाऊ, मी धाकटा भाऊ. आपण पुढे न यावे.’’ गोवळकोंड्याच्या बादशहाला मोठा भाऊ म्हणून शिवरायांनी संबोधले होते. शिवाजीराजे- कुतुबशहा यांच्या मैत्री करारातून दक्षिण दिग्विजयाचा मार्ग सुकर झाला. तेव्हा शिवरायांनी मालोजी घोरपडे यांना पत्र पाठवून कळवले, की ‘तुम्ही कुतुबशहाशी रुजवात करावी. कुतुबशहाशी बहुत रीती बोलोन, तुम्हास कुतुबशहाचा कौलाचा फर्मान घेऊन पाठविला आहे. तुम्ही मराठे लोक तुमचे गोमटे (कल्याण) व्हावे म्हणून तुम्हास लिहिले आहे.’ राजांनी मालोजी घोरपडे यांना आदिलशाहीतून कुतुबशाहीत जाण्याचा आग्रह केला, हे या पत्रावरून स्पष्ट होते. तेच मालोजी घोरपडे पुढे स्वराज्यात आले आणि संभाजीराजांचे सरसेनापती झाले. तत्कालीन राजकीय घडामोडीत लोककल्याण हे शिवरायांचे धोरण होते.

शिवाजी महाराज तमिळनाडूतील तिरूवाडी येथे असताना डच व्यापारी काही सवलती मागण्यासाठी आले. डचांबरोबर जो व्यापारी करार झाला, त्यात शिवरायांनी एक कलम घातले. ते पुढीलप्रमाणे, ‘‘इतर कारकिर्दीत तुम्हाला स्त्री, पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती, पण माझ्या राज्यात स्त्री, पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची आणि विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा प्रयत्न कराल, तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.’’ व्यापारी धोरणातही शिवरायांनी गुलामगिरीला विरोध करून मानवतावाद जपला. राजांचे बळ त्यांच्या साधेपणात, नैतिकतेत, चातुर्यात होते. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. ढाल-तलवारीच्या संघर्षातही त्यांनी प्रजेचे हित जोपासले. ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा. अन्यथा पेटती वात तोंडात धरून उंदीर धावत जाईल, त्यामुळे गवताची गंज जळून खाक होईल. मग जनावरांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही शेतकऱ्यांची भाजी, धान्य, लाकूड, चारा आणाल, हे तर मोगलापेक्षा अधिक जुलूमकारक आहे,’ अशा सूचना शिवरायांनी चिपळूणच्या अधिकाऱ्यांना १९ मे १६७३ रोजी दिल्या होत्या. यातून राजांचा प्रजावत्सल दृष्टिकोन दिसतो.

दुष्काळग्रस्तांना कशा प्रकारे मदत करावी याबाबतचे पत्र ५ सप्टेंबर १६७६ रोजी शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘गावोगावी जावा, शेतकऱ्यांना गोळा करा, त्यांना बैलजोडी द्या, खंडी दोन खंडी धान्य द्या, वसुलीसाठी तगादा लावू नका, ऐपत आल्यानंतरच वसूल करा, वाढीदिडीने वसूल न करता मुद्दलच तेवढी घ्यावी.’’  राजांचा पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांच्याशी संघर्ष झाला. त्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला पायबंद घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वराज्यनिर्मितीसाठी उपयोग करून घेतला. आरमार उभारण्यासाठी त्यांनी पोर्तुगीज कारागीर नेमले. इंग्रज आणि डचांशी त्यांनी व्यापारी करार केला. पण त्यांच्यावर अंकुश ठेवला. पोर्तुगीज आणि इंग्रजांनी राजांच्या योग्यतेची तुलना युरोपीय नायकांशी केली आहे.

राजांच्या राजकारणाचे, कौशल्याचे ध्येयधोरणांचे कौतुक त्यांच्या राजकीय विरोधकांनीही केले आहे. औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार खाफीखानाने ‘मुंतखबुल्लुबाब’ या फारसी ग्रंथात राजांच्या नैतिकतेचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘रायगडाला लागूनच शिवाजीने एक वाडा बांधला होता. उन्हाळ्यात तेथे पाण्याची टंचाई भासे. शिवाजीने आपल्या वाड्याला लागून विहीर बांधली होती. विहिरीजवळ दगडाची बैठक होती. तेथे शिवाजी बसत असे. विहिरीवर सावकारांच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यास येत. त्यांच्या मुलांना ते फळे देत असत. आपण आपल्या आईशी किंवा बहिणीशी बोलतो तसे ते त्या बायकांशी बोलत.’’ 


शिवाजी महाराजांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी राजकारण केले, पण लोककल्याणाचे धोरण कधीही सोडले नाही. राजे चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, धर्मनिरपेक्ष, न्यायी, समतावादी होते. त्यांचे राजकारण जातीयवादी, धर्मवादी, भाषावादी नव्हते, तर लोककल्याणकारी होते. शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन शासन आणि प्रशासन लोककल्याणकारी व्हावे, हीच  सदिच्छा!















सदर  लेख हा येथून संकलित  केला  आहे 

Sunday 8 March 2015

मुलांचे गुन्हेगारी वळण बदलताना

balgunhegar

गुन्हेगारीकडे वळणारी मुले केवळ झोपडपट्टीतच नाही, तर कॉस्मोपोलिटन सोसायटीत देखील सर्रास आढळतात. मात्र तथाकथित 'मोठ्या घरातील' मुलांचे अपराध पराकाष्ठेने लपवले जातात. अशा मुलांची आयुष्ये सुडबुद्धीने बिघडवण्यापेक्षा घडवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संसदीय समितीकडून बाल न्याय अधिनियमात बदल करण्याचा प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर परत एकदा 'नक्की चूक काय आणि बरोबर काय' अशी संदिग्धता निर्माण झालेली आहे. हिंसक स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या बालकांचे वय कमी करावे व त्यांना वेगळ्या प्रकारे हाताळावे असे सर्रास विधान करणारे वस्तुस्थितीशी अपरिचित असतात. या क्षेत्रात काम करणारेही कमी आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर होणारी चर्चा अनेकदा अपुऱ्या माहितीच्या आधारावर उथळपणे होताना दिसते.

सर्वसाधारणपणे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या प्रत्येकच बालकाच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये, नातेसंबंधामध्ये काही ना काही ओढाताण आढळून येते. जसे खोटे बोलणाऱ्या पालकांची मुलेदेखील कळत-नकळत खोटे बोलायला शिकतात आणि स्वतःची समज आल्यावर खोटे बोलणे सोडूनही देतात तसेच काहीसे इथे देखील आहे. बालपणापासूनच हिंसा, व्यसने यांच्याशी रोजचा परिचय असणारी मुले या बाबींना पटकन बळी पडतात. ही मुले केवळ झोपडपट्टीतच नाही, तर कॉस्मोपॉलिटन सोसायटीत देखील सर्रास आढळतात. फरक इतकाच, की झोपडपट्टीतील मुले तत्काळ कायद्याच्या कचाट्यात सापडतात व तथाकथित 'मोठ्या घरातील' मुलांचे अपराध पराकाष्ठेने लपवले जातात.

गेली काही वर्षे गंभीर केसेसमधील विधिसंघर्षग्रस्त बालकांसोबत काम करताना काही मुद्दे वारंवार लक्षात आले. त्यातील महत्त्वाचा मुद्दा हा की, बालकांमध्ये गंभीर गुन्हे करण्याचे प्रमाण सुदैवाने अतिशय अल्प आहे. बालकाचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांत प्रौढ व्यक्तीचा देखील समावेश असतो. तसेच जिचा खून केला जातो, ती व्यक्ती सदर बालक वा त्याचे कुटुंबीय यांचे वारंवार शोषण वा अत्याचार करणारी असते. एका बालकाचे वडील विवाहबाह्य संबंध व दारूचे व्यसन यात पुरते बुडालेले असत. बालकाने लहानपणापासून वडिलांना दारूच्या नशेत आईला मारताना, मुलांना मारतानाच पाहिलेले. एक दिवस मात्र बालकाच्या आईने बालकाच्या साक्षीने नवऱ्याच्या जेवणात विष कालवून त्याला मारण्याचा प्रयत्न केला परंतु नवरा न मेल्याने ‌'तो शुद्धीवर आल्यास आपणा सर्वांचाच जीव घेईल.' या भीतीने त्याला मारून टाकला. या मुलाला त्याचा पश्चाताप तर होताच, पण असाही प्रश्न होता की 'आम्ही किती काळ मारहाण, अवहेलना सहन करायची? आणि का?'

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात जेव्हा एकापेक्षा जास्त अल्पवयीन मुले सहभागी असतात, त्यावेळी असे गुन्हे हे पूर्वनियोजित नसून अचानक घडून आलेल्या घटनेचा परिणाम असतात. चार मुलांनी एका दुकानमालकाचा खून करण्याची केस. वरवर पाहाता चार अल्पवयीन बालकांनी त्यांच्याच दुकानमालकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. बालकांशी बोलले असता असे लक्षात आले, की सदर दुकानमालक अल्पवयीन बालकांनाच कामास ठेवत असे. त्यांना दुकानाच्यावरील घरात वा गच्चीतच निवारा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. दारूच्या नशेत मुलांना अमानुष मारहाण, शिवीगाळ तर रोजच होत असे. अशा या पाशवी माणसाच्या अत्याचारांनी बळी पडलेल्या या मुलांनी एक दिवस अचानक, रागाच्या भरात सगळ्यांचाच सोक्षमोक्ष लावायचा ठरवला. मालकाला तो दारूच्या नशेत असताना भरपूर मारहाण करताकरताच बेभान होऊन पुरतेच संपवून टाकले.

काही वेळा अत्यंत आश्चर्यकारकरीत्या असे गंभीर गुन्हे घडतात. दोन अतिशय चांगल्या मित्रांमध्ये थट्टा-मस्करी चालू असताना त्याचे पर्यवसान भांडण-मारामारी आणि एकाच्या मृत्यूमध्ये झाले. ज्या मुलांचा मित्र गेला त्या मुलाला स्वतःवर गुन्हा दाखल झाला, यापेक्षा देखील जवळचा मित्र गमावला याचा धक्का पचवता येणे कठीण झाले. एकूणच खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनेची पार्श्वभूमी अधिक गंभीर असते, परंतु योग्य दिशा मिळाल्यास अशा मुलांना केलेल्या कृत्याचा पश्चातापदेखील होतो. खुनासारखे गुन्हे मुले वारंवार सर्रास करीत नाहीत हे देखील समजणे आवश्यक आहे. काही मुलांमध्ये अनावर राग व रागावर योग्य नियंत्रण न ठेवता येणे या प्रकारची मानसिक समस्या असते. अशा मुलांच्या रागाला कुटुंबियांच्या हिंसक स्वभावाची जोड मिळाली असता गुन्हे घडतात. योग्य मानसोपचार मिळाल्यामुळे शांत झालेली काही मुले आजही आमच्या संपर्कात आहेत. काही वेळा घरातील मंडळी आपआपल्याच विश्वात मग्न असल्याने लक्ष वेधून घेण्यासाठी वारंवार चोरीसारखे गुन्हे करणारी मुले देखील आढळतात.

बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत अनेकदा मुलगा व मुलगी यांचे त्यांच्या वयाला अनुसरून प्रेमसंबंध असतात. घरून लग्नाला संमती मिळणार नाही म्हणून ते हाताला लागेल तो ऐवज घेऊन पळून जातात, फिल्मी पद्धतीने लग्न करून एकत्र राहायला लागतात. काही दिवसांतच अशा मुलांचा शोध लागतो. मधल्या समाजात कुटुंबाची 'अब्रू' गेलेली असते आणि या सगळ्याचे पर्यावसान मुलावर अपहरण आणि बलात्काराची केस दाखल करण्यात होते.

जर या मुलांना ५ ते २० वर्षांपर्यंत तुरुंगात टाकले तर त्याने नक्की काय साध्य होईल? सध्याची तुरुंगांची अवस्था पहाता प्रत्येक तुरुंग त्याच्या क्षमतेच्या कितीतरी पटीने जास्त भरलेला आहे. त्यामुळे तेथे ठेवून माणसाला अद्दल घडेल, शहाणपण येईल, सुधारणा होईल असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. तरी जर मुलांना तुरुंगात डांबलेच तरी वयाच्या जास्तीत जास्त २५-३०व्या वर्षी ती बाहेर येणार आणि तोवर प्रश्न अजून वाढलेले असणार. शिक्षण नाही, नोकरी मिळणार नाही, समाजात स्वीकार होणार नाही आणि मग शेवटचा पर्याय हाच की तुरुंगात झालेल्या ओळखीच्या आधारावर परत वेगळ्या मार्गाला लागतील. यातून नक्की काय साध्य होणार? अशा मुलांची आयुष्ये सुडबुद्धीने बिघडवण्यापेक्षा घडवण्याचा प्रयत्न हवा.

(टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या रिसोर्स सेल फॉर ज्युवेनाइल जस्टिस या प्रकल्पाचे अधिकारी)

सदर लेख  हा येथून संकलीत केला 

आरक्षण आणि त्यापलीकडे...


agralekh
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने राज्यातील मुस्लिम समाजाला नोकरी तसेच शिक्षणात दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे,असेच म्हणावे लागेल. गेल्या सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय भाजप सरकार आल्यावर रद्द होणार हे जवळपास निश्चितच समजले जात होते. भारतीय राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी शिक्षण, नोकरी व राजकीय आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला. जातीच्या नावाखाली ज्या घटकांना हजारो वर्षे ज्ञानबंदी तसेच धनसंचय बंदी करण्यात आली होती. समाजातील ते घटक आरक्षणामुळे स्पर्धेत येऊन इतरांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रे काबीज करताना आज दिसतात. भारतीय मुस्लिम समाज स्वातंत्र्यानंतर एका मोठ्या मानसिंक गंडाखाली जगत आहे. फाळणीमुळे कायम या समाजाला संशयाच्या भोवऱ्यात वावरावे लागते आहे. फाळणीनंतर बहुतांश मुस्लिम जमीनदार पाकिस्तानात निघून गेल्याने भारतीय मुस्लिमांमध्ये दखल घेण्याजोगा मध्यमवर्ग तयारच होऊ शकलेला नाही. मध्यमवर्ग हा सामाजिक सुधारणांच्या प्रक्रियेत उत्प्रेरकाचे काम करीत असतो. या कमतरतेमुळे भारतीय मुस्लिम सामाजिक, शैक्षणिक व त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या मागास राहिला. या मागासलेपणाची भयावह सांख्यिकी सच्चर समितीच्या अहवालामुळे समोर आली आहे. ८० टक्के निरक्षरतेचे प्रमाण असलेल्या या समाजात सहा ते चौदा वयोगटातील केवळ २५ टक्के मुले शाळेचे तोंड पाहतात. आयएएस, आयएफएस, आयपीएस या भारतीय प्रशासकीय सेवेत अत्युच्च पदांवर एक ते चार टक्के इतकेच मुस्लिमांचे प्रमाण आहे. ३१ टक्के मुस्लिम गरिबीरेषेच्या खाली राहतात. अशा पद्धतीची विषमतामूलक परिस्थिती कुठल्याही समाजात अस्थिरता पसरवण्याचे काम करते. दुर्दैवाने, हिंदू-मुस्लिम प्रश्नाचे राजकारण करून ईप्सित साध्य करून घेण्याचे काम काँग्रेससह सर्वच पक्ष सतत करतात. राज्यातील मुस्लिमांना शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये दिलेल्या पाच टक्के आरक्षणामुळे सच्चर आयोगाने उपस्थित केलेले प्रश्न सुटण्याची शक्यता नव्हतीच. या समाजाला विश्वास देऊन त्याच्या उन्नतीसाठी सकारात्मक पावले सरकारी पातळीवरून उचलणे ही खरी गरज आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यात सेक्युलर शब्द घालून देशात सेक्युलर वातावरण तयार होत नाही, हे सर्वच पक्षांनी लक्षात ठेवायला हवे. मुस्लिमांमधील केवळ तीन टक्के मुले मदरशात जातात. असे असताना सरकार मदरशांना मदत देते किंवा हज यात्रेच्या सबसिडीसाठी शेकडो कोटी रूपयांची तरतूद करते, त्यापेक्षा आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात हा समाज यावा यासाठी हे पैसे खर्च केल्यास त्याचा खरा उपयोग होऊ शकतो. मात्र, असे केल्यास गरीब मुस्लिमांच्या आपमतलबी नेतृत्वाचे धर्माच्या नावाखाली सुरू असलेले दुकान बंद होण्याची भीती असल्याने सध्यातरी या प्रश्नाचा तिढा सुटणे कठीण आहे.



सदर  लेख हा  येथून  संकलित  केला