Friday 29 November 2013

“दुर्घटना से सावधानी बेहतर”

दुनिया में आज जो बीमारियां महामारी का रूप ले चुकी हैं उनमें से सबसे खतरनाक है एड्स. एड्स एक ऐसी बीमारी है जिसका नाम तो छोटा है लेकिन इसका परिणाम काफी भयावह है. यह बीमारी कईयों को मजे के रूप में मिलती है तो कई इसका शिकार गलती से हो जाते हैं. यह बीमारी इंसान को धीमी मौत मारती है. पर इसकी मौत इतनी भयावह होती है कि लोग इसके खौफ से ही मर जाते हैं. आज दुनिया भर में 34 करोड़ से ज्यादा लोग इसकी चपेट में हैं.

एक नजर इस खौफनाक रोग के साम्राज्य पर
हाल ही में जारी हुए यूएन एड्स की रिपोर्ट में साफ हो गया है कि 2001 से लेकर 2010 तक दुनिया भर में एड्स रोगियों की संख्या में तेजी से वृद्धि हुई है. दुनिया भर में करीब 34 करोड़ लोग आज इस भयावह बीमारी के शिकार हैं.

इसके साथ ही हर साल इस बीमारी से करीब 2 करोड़ लोग जिंदगी की जंग हार जाते हैं. सहारा अफ्रीका और मध्य अफ्रीका में इस बीमारी का प्रकोप सबसे ज्यादा है. साथ ही इस बीमारी से महिलाएं ज्यादा पीड़ित हैं. एशिया में भी यह बीमारी दिनों-दिन अपने पांव पसार रही है. भारत में एड्स तेजी से फैल रहा है. भारत में 25 लाख लोग इससे पीड़ित हैं. इसके साथ ही इस रिपोर्ट में यह बात भी सामने आई है कि भारत में अधिकतर लोग एड्स की चपेट में होने के बाद भी बिना इस बीमारी का इलाज करवाए जिंदगी जी रहे हैं जिससे उन्हें काफी खतरा है.

Aidsएड्स क्या‍ है?
एड्स का पूरा नाम ‘एक्वायर्ड इम्यूनो डेफिसिएंशी सिंड्रोम’ है और यह बीमारी एच.आई.वी. वायरस से होती है. यह वायरस मनुष्य की प्रतिरोधी क्षमता को कमज़ोर कर देता है. एड्स एच.आई.वी. पाजी़टिव गर्भवती महिला से उसके बच्चे को, असुरक्षित यौन संबंध से या संक्रमित रक्त या संक्रमित सूई के प्रयोग से हो सकता है.

एच.आई.वी. पाजी़टिव होने का मतलब है, एड्स वायरस आपके शरीर में प्रवेश कर गया है. हालांकि  इसका अर्थ यह नहीं है कि आपको एड्स है. एच.आई.वी. पाजीटिव होने के 6 महीने से 10 साल के बीच में कभी भी एड्स हो सकता है.

एड्स फैलने के कारण
एचआईवी से संक्रमित व्यक्ति के साथ असुरक्षित संभोग करना इस मर्ज के प्रसार का एक प्रमुख कारण है. ऐसे संबंध समलैंगिक भी हो सकते हैं. अन्य कारण हैं:

* ब्लड-ट्रांसफ्यूजन के दौरान शरीर में एच.आई.वी. संक्रमित रक्त के चढ़ाए जाने पर.
* एचआईवी पॉजिटिव व्यक्ति पर इस्तेमाल की गई इंजेक्शन की सुई का इस्तेमाल करने से.
* एचआईवी पॉजिटिव महिला की गर्भावस्था या प्रसव के दौरान या फिर स्तनपान कराने से भी नवजात शिशु को यह मर्ज हो सकता है.
* इसके अलावा रक्त या शरीर के अन्य द्रव्यों जैसे वीर्य के एक दूसरे में मिल जाने से. दूसरे लोगों के ब्लेड, उस्तरा और टूथ ब्रश का इस्तेमाल करने से भी एचआईवी का खतरा रहता है.

एड्स के लक्षण
एड्स होने पर मरीज का वजन अचानक कम होने लगता है और लंबे समय तक बुखार हो सकता है. काफी समय तक डायरिया बना रह सकता है. शरीर में गिल्टियों का बढ़ जाना व जीभ पर भी काफी जख्म आदि हो सकते हैं.

एड्स संबंधित जांचें
* एलीसा टेस्ट
* वेस्टर्न ब्लॉट टेस्ट
* एचआईवी पी-24 ऐंटीजेन (पी.सी.आर.)
* सीडी-4 काउंट

एड्स का उपचार
* एचआईवी संक्रमित लोगों के लिए आशावान होना अत्यंत महत्वपूर्ण है. ऐसे भी लोग हैं जो एचआईवी/एड्स से पीड़ित होने के बावजूद पिछले 10 सालों से जी रहे हैं. अपने डॉक्टरों के निर्देशों पर पूरा अमल करें. दवाओं को सही तरीके से लेते रहना और एक स्वस्थ जीवनचर्या बनाये रखने से आप इस रोग को नियंत्रित कर सकते हैं.
* एच.ए.ए.आर.टी. (हाइली एक्टिव ऐंटी रेट्रो वायरस थेरैपी) एड्स सेंटर पर नि:शुल्क उपलब्ध है. यह एक नया साधारण व सुरक्षित उपचार है.

एड्स को लेकर भ्रम
कई लोग सोचते हैं कि एड्स रोगी के साथ उठने बैठने से यह रोग फैलता है तो यह गलत है. यह बीमारी छुआछूत की नहीं है. इस बीमारी को लेकर समाज में कई भ्रम हैं जिन्हें दूर करना बहुत जरूरी है. जैसे:

एड्स इन सब कारणों से नहीं फैलता:
* घर या ऑफिस में साथ-साथ रहने से.
* हाथ मिलाने से.
* कमोड, फोन या किसी के कपड़े से.
* मच्छर के काटने से.

एड्स एक रोग नहीं बल्कि एक अवस्था है. एड्स का फैलाव छूनेहाथ से हाथ का स्पर्शसाथ-साथ खानेउठने और बैठनेएक-दूसरे का कपड़ा इस्तेमाल करने से नहीं होता है. एड्स पीड़ित व्यक्ति के साथ नम्र व्यवहार जरुरी है ताकि वह आम आदमी का जीवन जी सके.

कल एड्स का मतलब था जिंदगी का अंत, पर आज इसे एक स्थाई संक्रमण समझा जाता है, जिसे नियंत्रित किया जा सकता है. भविष्य में हो सकता है एड्स का इलाज संभव हो जाए इसलिए इस संदर्भ में होने वाली हर गतिविधि की जानकारी प्राप्त करते रहना हम सभी के लिए जरूरी है. वैवाहिक जीवन की मर्यादा और एक-दूसरे के प्रति विश्वास को बनाए रखना और सावधानी ही इस रोग से बचाव का एकमात्र उपाय है. एड्स की रोकथाम “दुर्घटना से सावधानी बेहतर” की तर्ज पर ही मुमकिन है.

Thursday 14 November 2013

आपली मानसिकता कधी बदलवणार ???

Photo: आपली मानसिकता कधी बदलवणार ???

आम्ही चांगलं शिकून कुठल्याही मोठ्या पदावर चिकटलो किंवा डॉक्टर / इंजिनिअर च्या रांगेत जावून बसलो तरी आम्हाला सुशिक्षित म्हणावं की नाही, या प्रश्नाचा गुंता सुटता सुटत नाही. आमच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आम्हाला अजून पर्यंत वाटत नाही. आमच्याकडे फोन स्मार्ट आले, पण आम्ही स्मार्ट कधी होणार …. असले निरर्थक प्रश्न आम्हाला भेडसावत नाही ! आमच्याकडे सगळ्यासाठी वेळ आहे, पण स्वत:च्याच विचारांवर विचार करण्यचा विचार आमच्या मेंदूच्या जवळपास पण फिरकत नाही.

भर चौकात, भर रस्त्यात - आई-बहिणी वर गलिच्छातल्या गलिच्छ शिव्या द्यायला आम्ही मर्दानगी समजतो. अगदी त्या शिव्यांमधील प्रत्येक अक्षराचा अर्थ आम्हाला ठावूक असून देखील, आजूबाजूला कोणी लेकुरवाळ, कोणी महिला वा वयोवृद्ध तर नाहीत , याची आम्हाला फिकीर नसते …. पण 'SEX' हा नुसता शब्द देखील उच्चारताना आम्ही दाही दिशांकडे नजर टाकतो.

अहो आम्ही सुसंस्कृत ना …. सुसंस्कारांचा परिणाम … दूसऱं काय !

आमच्या मनात दर सेकंदाला अगणित घाण विचार आले तरी चालतात, पण तेच एका स्त्री पात्राने, महिलेने 'SEX' / 'निरोध' असले शब्द उच्चारले तरी ती 'त्या टाईप' ची होवून जाते. पुरुष बिअर-बार मध्ये जावू शकतो …. Dance बार मध्ये मिरवू शकतो …. Overnight Stay असणाऱ्या सहली attend करू शकतो , पण त्याच्या मादीने असा कुठलाही प्रकार केलेला त्याला खपत नाही. अशाने त्याची 'सामाजिक प्रतिष्टा' धुळीत मिळते. सुशिक्षित ना ……।

आजही बऱ्याच पुरुषांसाठी स्त्रीया या 'Kitchen' आणि 'Bed' पुरत्याच मर्यादित राहतात, हे बघून-ऐकून आपण खरंच 'SMART PHONE' वाल्यांच्या युगात आहोत, हा विश्वास बसत नाही. मानसिकता ही आपोआप घडत असली तरी ती आपोआप बदलत नसते. आणि तो बदल घडवून आणण्यासाठी 'स्वत:च्याच विचारांवर खोल विचार करण्याची आवश्यकता असते.


विचार- मंगेश सपकाळ.
--------------------------------------------------------------
आम्ही चांगलं शिकून कुठल्याही मोठ्या पदावर चिकटलो किंवा डॉक्टर / इंजिनिअर च्या रांगेत जावून बसलो तरी आम्हाला सुशिक्षित म्हणावं की नाही, या प्रश्नाचा गुंता सुटता सुटत नाही. आमच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आम्हाला अजून पर्यंत वाटत नाही. आमच्याकडे फोन स्मार्ट आले, पण आम्ही स्मार्ट कधी होणार …. असले निरर्थक प्रश्न आम्हाला भेडसावत नाही ! आमच्याकडे सगळ्यासाठी वेळ आहे, पण स्वत:च्याच विचारांवर विचार करण्यचा विचार आमच्या मेंदूच्या जवळपास पण फिरकत नाही.

भर चौकात, भर रस्त्यात - आई-बहिणी वर गलिच्छातल्या गलिच्छ शिव्या द्यायला आम्ही मर्दानगी समजतो. अगदी त्या शिव्यांमधील प्रत्येक अक्षराचा अर्थ आम्हाला ठावूक असून देखील, आजूबाजूला कोणी लेकुरवाळ, कोणी महिला वा वयोवृद्ध तर नाहीत , याची आम्हाला फिकीर नसते …. पण 'SEX' हा नुसता शब्द देखील उच्चारताना आम्ही दाही दिशांकडे नजर टाकतो.

अहो आम्ही सुसंस्कृत ना …. सुसंस्कारांचा परिणाम … दूसऱं काय !

आमच्या मनात दर सेकंदाला अगणित घाण विचार आले तरी चालतात, पण तेच एका स्त्री पात्राने, महिलेने 'SEX' / 'निरोध' असले शब्द उच्चारले तरी ती 'त्या टाईप' ची होवून जाते. पुरुष बिअर-बार मध्ये जावू शकतो …. Dance बार मध्ये मिरवू शकतो …. Overnight Stay असणाऱ्या सहली attend करू शकतो , पण त्याच्या मादीने असा कुठलाही प्रकार केलेला त्याला खपत नाही. अशाने त्याची 'सामाजिक प्रतिष्टा' धुळीत मिळते. सुशिक्षित ना ……।

आजही बऱ्याच पुरुषांसाठी स्त्रीया या 'Kitchen' आणि 'Bed' पुरत्याच मर्यादित राहतात, हे बघून-ऐकून आपण खरंच 'SMART PHONE' वाल्यांच्या युगात आहोत, हा विश्वास बसत नाही. मानसिकता ही आपोआप घडत असली तरी ती आपोआप बदलत नसते. आणि तो बदल घडवून आणण्यासाठी 'स्वत:च्याच विचारांवर खोल विचार करण्याची आवश्यकता असते.


(सदर लेख इथून संकलित केला आहे.)

विचार- मंगेश सपकाळ.
--------------------------------------------------------------

जातीव्यवस्था मानणारेच खरे गुन्हेगार !!


जातीव्यवस्था मानणारेच खरे गुन्हेगार !!




ब्राह्मण म्हणून द्वेष, चीड, राग निर्माण करणे, केवळ एखादा व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून त्याचा तिरस्कार करणे ह्या घातक प्रवृत्ती आहेत. काही संघटना ह्या फक्त व्यक्तीद्वेषावर उभ्या राहत असतील तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारतीय राष्ट्रवाद याला मुठमाती दिल्यासारखे होईल. परंतु जो ब्राह्मण निर्मित 'मनुवाद' जोपासत असेल तोच खरा जातीयवादी आहे मग तर कुठल्याही जाती, धर्माचा असेना. माझे अनेक मित्र, मैत्रिणी ब्राह्मण आहेत तेही बाबासाहेबांचे विचार जोपासतात, आज इतके ब्राह्मण समाजातले लोक आहेत त्यांनी मनुवादाला मूठमाती दिलेली आहे. जेव्हढ बाबासाहेबांचे विचार आपल्या समाजातील लोक वाचत नाहीत त्यापेक्षा अधिक अभ्यास काही प्रबोधनाचा मार्ग स्वीकारलेले ब्राह्मण करीत आहे याचा अर्थ सर्वच ब्राह्मण चांगले किंवा सर्वच ब्राह्मण वाईट असा होत नाही. बाबासाहेबांच्या संकल्पेनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि भारतीयत्वाची कल्पना दूर करून काही संघटना आणि लोक केवळ ते जन्माने ब्राह्मण आहे म्हणून जातीय द्वेष निर्माण करून जातीयतेचा हा पेटता निखारा तसाच तेवत ठेवतात. समाज प्रबोधनासाठी ३३ कोटी देवांना लाथ मारणारे अभिनेते ज्येष्ठ समाजसेवक श्रीराम लागू , ब्राह्मणवाद हा चुकीचा आहे अस सांगणारे प्र.के.अत्रे असो कि पु.ल.देशपांडे किवा अंधश्रद्धेविरुद्ध लढताना गोळ्या खाऊन मरणारे नरेंद्र दाभोळकर या सारखे अनेक लोक ब्राह्मणच आहेत. जर नुसता ब्राह्मण नावाने द्वेषसत्र सुरु ठेवले तर जो प्रामाणिक काम करणारा काही ब्राह्मण वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारख होईल. गांधी, जिना पेक्षाही श्रेष्ठ न्यायमूर्ती रानडे आहेत असे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग रानडे सारखी महापुरूषे हे त्यांच्याच ब्राह्मणव्यवस्थेशी झगडत होते. मुळात जो ब्राह्मणवाद पाळणारे कोणीही असो मग तेच खरे देशाचे दुश्मन आहेत असे मला वाटते.

ब्राह्मणापेक्षाही जास्त प्रमाणात जातिवाद आणि ब्राह्मणवाद ब्राह्मणवादाच्या सावलीत वाढणाऱ्या काही जातीत तो अधिक आहे. स्वतःच्या जाती ब्राह्मण व्यवस्थेमध्ये शुद्र असूनही इतर जाती धर्माला कानिष्टतम दाखविणाऱ्या या जाती खरा ब्राह्मणवाद पाळत आहेत आणि अगोदर अनेक हजारो वर्षापासून जातीपातीच्या उतरंडी खाली जगण्यातच धन्यता ह्या काही मानात आलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये खासकरून मराठा समाजाकडून अनेक कालखंडापासून इतर मागाससमाजावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे. याचा अर्थ संपूर्ण मराठा समाज दोषी नाही परंतु अलीकडच्या काळात मराठा समाजामध्ये याचे प्रमाण बहुतांश आहे. समाजप्रबोधनाचा ठेका घेतलेल्या काही संघटना विशेष करून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांची मानसिकता फक्त ब्राह्मण द्वेष निर्माण करणारी अधिक वाटते. एक नंबर च्या खुर्चीवर असलेला ब्राह्मण समाज केव्हा खाली येउन त्यावर आपला नंबर केव्हा लागतो हेच या संघटनांच्या कृतीतून अधिक भासते. मागासवर्गीयांवर जेव्हा ज्या समाजाकडून अन्याय, अत्याचार होतो तेव्हा त्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना त्यांच्या समाजात जाऊन याच प्रबोधन करतात का ?? मागास समाजावर जेंव्हा अत्याचार, खून , बलात्कार इ. वाईट गोष्टी होतात त्यावर कधी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड कधी तोंडातून ब्र काढतात का ?? मग रस्त्यावर उतरून न्याय हक्क मिळवून देणे तर दूरची गोष्ट आहे. मूलनिवासी, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, अम्बस सारख्या संघटना फक्त पैसा गोळा करणे आणि समाजप्रबोधनाच्या नावाखाली भाषणे देणे या व्यतिरिक्त गेल्या २५-३० वर्षापासून काहीही करीत नाहीत. मराठा संघटनाना अन्याय, अत्याचार फक्त आपल्या समाजावर दिसतो, अशा जबाबदार लोकांची जबाबदारी हवी कि समाजाला वाईट गोष्टीपासून परावृत्त करणे. निव्वळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेवून आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या संघटना आणि विनायक मेटे सारखे लोक फक्त समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करतात. अन्याय अत्याचार जेव्हढे जबाबदार आहेत तेव्हढ्याच ह्या संघटना प्रबोधनाच्या नावाखाली अन्याय, अत्याचारावर मूकपणा बाळगणारे जबाबदार आहेत.


अन्याय, अत्याचार जिथे झाला तिथली परिस्तिथी न जाणता आपणही पेपर, टीव्ही मधून येणाऱ्या बातम्यांना हवा देऊन फक्त संघर्षाचे आणि जातीयतेचे विष पेरत असतो. समाजातील काही लोक फक्त मोठेपणा दाखविण्यासाठी सदर प्रकरणाला हवा देऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम करतात. ज्या कुटुंबावर, समूहावर अन्याय अत्याचार झाला त्या कुटुंबाला कायदेशीर साथ देणे, गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी झटणे, त्या कुटुंबाला आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, परत असले अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, जाती ह्या नष्ट झाल्या पाहिजे यासाठी जातीअंताचा लढा सुरु ठेवणे, हि आपली आंबेडकरी समाजाची मोठी जबाबदारी असली पाहिजे. तथागत भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता, शांती, अहिंसा, मैत्री, प्रेम या तत्वांचे रुजुनीकरण होण्यासाठी झटणे तेव्हाच अन्यायग्रस्त समाजाला आणि त्यादृष्टीने तशी व्यवस्था निर्माण होण्याला न्याय देण्यासारखे होईल




(सदर लेख इथून संकलित केला आहे.)

Monday 11 November 2013

बाबासाहेब कुणाचे??

             या देशाला एकसंध ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी मानवमुक्तिचा लढा दिला, हे काम समजून 

घ्यायला अजून काळ लागेल. मात्र असे बाबासाहेब कुठल्या विशिष्ट समाजाचे वा गटाचे नाहीत. महामानव 

हा सर्व मानव समाजाला पुढे नेत असतो. आपले बाबासाहेब हा अनेकदा ऐकलेला शब्दप्रयोग आज 

बाबासाहेबांच्या महापनिरिर्वाणानंतर ५७ वर्षांनी करताना हात थरथरतो आहे. आज आपले बाबासाहेब असं 

सर्वसमावेशक सर्वनामासह केलेलं विधान कोणाच्या भावना दुखावून जाईल हे सांगता येत नाही. मात्र 

भारतीय म्हणवून घेणार्या प्रत्येकाला हे म्हणण्याचा अधिकार आहे. हिंदू, बौद्ध, जैन, दिन ए इलाही हे धर्म 

देशातील प्रत्येक नागरिकासाठी समान हक्काचा कायदा-घटना-धर्म ज्यांनी फार मोठ्या परिशीलनाने 

निर्माण केला ते बाबासाहेब एका विशिष्ट गटाचे अथवा समूहाचे कसे होऊ शकतात? हा प्रश्न माझ्या मनात  

सातत्याने येत असतो.


                डॉ. बाबासाहेबांचं हे फार मोठं योगदान हळूहळू विस्मृतीत चाललं आहे. डॉ. बाबासाहेब हे 


केव्हाही एका जातीपुरते किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. सर्वधर्मसमावेशक विचार करणारा हा नेता अखंड 

भारतातील दलित, उपेक्षित, शोषित समाजाच्या उत्थानाचा मार्ग सांगणारा महान द्रष्टा होता. महाडच्या 

चवदार तळ्याला आज पवित्र स्थान म्हणून महत्त्व आलं आहे. हा समतेचा स्फुल्लींग ज्या ठिकाणी पडला 

त्या चवदार तळ्याच्या पाण्याने पेट घेऊन एका क्रांतीला जन्म दिला. त्या दिवशी सवर्णांनी पाणी बाटलं 

म्हणून सुरबानाना टिपणीसांच्या घरावर काठ्या, सोटे घेऊन हल्ला केला. महत्त्वाचं असं की त्यावेळी खोत 

सवर्ण म्हणून ज्यांचा उल्लेख येईल असे सुरबानाना, भाई अनंतराव चित्रे, बापुसाहेब पोतनीस यांसारखे 

धडाडीचे पुरोगामी विचारवंत डॉ. बाबासाहेबांच्या बरोबर होते. सुरबानाना टिपणीसांनी तर डॉ. बाबासाहेबांची 

साथ अखेरच्या क्षणापर्यंत सोडली नाही. डॉ. बाबासाहेबांना जातीय किंवा धार्मिक बंधनात गुंतवून 

ठेवणार्यांनी याचा विचार करणं अगत्याचं आहे. अर्थात आपल्या कर्तृत्व शून्यतेवर पांघरूण घालण्यासाठी 

मूळ वैचारिक गाभा आपल्या सोयीने बदलण्याचा अधिकार राजकीय पुढार्यांना आहे हे मान्य करणंही 

तितकंच गरजेचं आहे.


              डॉ. बाबासाहेबांचा पी.एच.डी. चा प्रबंध अर्थशास्त्रावरचा होता. त्यांनी शेतीविषयक विचार 


मांडताना म्हटलं आहे की शेतीचा व्यवसाय हा प्रमुख उद्योग आहे. बाबासाहेबांचं लक्ष श्रमिक शेतकर्यांच्या 

दुरवस्थेकडे त्यांच्या चळवळीच्या सुरुवातीपासूनच वळलं होतं. महाडच्या १९२७ च्या डिसेंबरच्या दुसर्या 

परिषदेत केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारण्यासाठीची ही चळवळ आर्थिक गुलामगिरी 

तोडण्यासाठी देखील आहे हे आवर्जून मांडलं आहे.


           
 डॉ. बाबासाहेबांनी कुलाबा जिल्ह्यात उभा केलेला खोती विरुद्धचा लढा हा शेतकरी, शेतकसणारे   

यांचा जमीनदार-सावकार यांच्याविरुद्धचा लढा होता. महात्मा गांधींनी केलेला चंपारण्याचा लढा जमीनदार 

विरुद्ध सरकार असा होता. म्हणून आमचे वडील म्हणत की, डॉ. बाबासाहेबांनी खर्या अर्थाने या देशात 

शेतकरी चळवळ प्रथम सुरू केली. त्यावेळी कुलाबा जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या 

गेलेल्या या लढ्यात ज्याप्रमाणे खोत हे सर्व धर्माचे आणि जातीचे होते तसे कुळही विविध जाती धर्माचे 

होते. चिखलपच्या महार कुळाला एका खोताने चाबुकाने झोडून ठार मारलं. त्या अन्यायाचा प्रतिकार 

करण्यासाठी माणगाव तालुक्यात चंदोरे या गावी जी सभा घेण्यात आली त्याचं नेतृत्व सुरबानानांनी केलं. 

त्यात सामील झालेले कुळ हे कुणबी, मराठा, चांभार, महार अशा विविध जातींचे होते. तिथे जातीभेदाला 

वाव नव्हता. शोषित समाजाचं शोषणकर्त्याविरुद्धचा लढा होता तो. या ठिकाणी एका गोष्टीची आठवण 

करून द्यावी असं वाटतं. चवदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतरचं.... मात्र विस्मरणात गेलेली एक गोष्ट 

इथे नमूद करतो. महाड नगर परिषदेने १९४० साली डॉ. बाबासाहेबांना सन्मानपत्र देऊन गौरवलं. त्याला 

उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात… मला आज मानपत्र देऊन आपण माझा जो सत्कार केलात त्याबद्दल 

मी आपल्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. कारण गेली दहा-पंधरा वर्षं मी जे काही सार्वजनिक कार्य करत 

आहे त्याचा उगम महाडातच झाला आहे. तिथेच मला स्फूर्ती मिळाली आणि या शहरात या कार्यात मला 

सहकारीमिळाले. ते मिळाले नसते तर माझं कार्य यशस्वी झालं नसतं. मागे आम्ही चवदार तळ्याच्या 

पाण्यासाठी   दंगा केला. पण तो विसरून महाडकर मला लोभाने वागवतात. हे विशेष होय. माझं कार्य  

दिसायला जातीवाचक असलं तरी ते खरं राष्ट्रीय कार्य आहे. देशातील सर्व लोक संघटित होऊन एक राष्ट्र 

निर्माण व्हावं ही माझी सदिच्छा आपण ओळखली आहे हे आजच्या मानपत्राने सिद्ध झालं आहे.


        


             

(सदर लेख इथून संकलित केला आहे.)